Friday, September 9, 2016

नाव का बदलायचं


आरती जाधव


‘स्त्री असो...किंवा पुरूष’ लग्नानंतर दोघांच्या आयुष्यात बरेचसे बदल घडून येतात. आर्थिक असो किंवा अन्य कोणतेही. मात्र, बर्याच कुटुंबांमध्ये लग्नानंतर मुलीचे नाव बदलण्याची प्रथा सुरू आहे. सासरी आल्यावर मुलींचे बारस करून नाव ठेवण्याचा आज जणुकाही ट्रेण्डच सुरू आहे. परदेशातील अनेक देशांनीही आता हा प्रथा स्विकारली आहे. मात्र, ही प्रथा परंपरा सुरू ठेवण्याच्या नादात दुसºया घरातून आलेल्या मुलांच्या मनाचाही विचार केला जात नाही.निदान मुलीला विचारा तरी ‘‘बाई गं तुला कोणत नावं पसंत आहे’’, हे विचारण्याचीही तसदी ही मंडळी घेताना दिसत नाही. त्यामुळे, एकप्रकारे लग्नानंतर मुलींच्या सहनशक्तीची परिसीमा येथूनच सुरू होते. केवळ एक सिस्टिम म्हणून ही प्रथा आहे! दुसरे काही नाही! हे समाजातील लोकांना समजून घेतले पाहिजे. त्यासाठी मुलींचे नाव न बदलता ‘संस्कृती’ बदलण्याची खºया अर्थाने गरज आहे.
‘लग्न’ म्हणजे प्रत्येक मुलींच्या आयुष्यातील अविस्मरीय क्षण असून हे केवळ दोन मनाचं नाहीतर तर दोन कुटुंबांचे मिलन असतं, असं म्हटलं जातं. लग्न झाल्यानंतर माहेरची लाडकी ‘लेक’ दुसºया कुटुंबाची ‘सून’ होते. मात्र; आयुष्याच्या या वाटेवर ‘लग्न’ हे चित्रपटाच्या मध्यांरासारखे असते. चित्रपट मध्यांतरानंतर तो वेगळीच कलाटणी घेतो. त्याचप्रमाणे मुलीचे आयुष्यही लग्नानंतर पुर्णत: बदलून जाते. जन्मत: ज्या नावाने मुलगी स्वत:ची ओळख समाजात निर्माण करते; लग्नानंतर तिचे पुन्हा ‘नामकरण’ करून हेच नाव बदलले जाते. तिचे पहिले आडनाव जाऊन नवीन आडनाव येते. वडिलांच्या जागी नवºयाचे नाव येते. सासरी आल्यानंतर मुलींसाठी नवे लोक, नवी नाती, नवे वातावरण सगळं कसं नवीन असतं. ती सगळ्या नव्या गोष्टींना सामोरी जात असते. पण पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या जुनाट परंपरांमुळे हळुहळु ती आपली जुनी ओळख बदलून नवीन ओळख तयार करते. मुलांच्या तुलनेत मुली प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. आपल्या कर्तृत्वाने देशभरात नावलैकिक मिळवत आहेत. याचा प्रत्यय यंदाच्या रिओ आॅलिम्पिंक मध्ये प्रत्येक भारतीयांना आला. असे असतानाही तिचं पहिलं नाव बदलून तिच्या व्यक्तिमत्त्वात बदल का करावा? तिला तिचं जुनंच नाव का कायम ठेवता येऊ नये? हा विचार व्हायला हवा.
लहानपणी आई-वडिलांनी लाडाने ठेवलेले नाव असं एकदम बदलायचं आणि तिला वेगळ्या नावाने हाक मारायची किती वेगळं वाटतं असेल ना ‘तिला’? आणि तिच्या आई-वडिलांना, भाऊ-बहिणींनाही वाटत असेल की, लहानपणापासून आपण तिला ज्या नावाने हाक मारायचो ते एकदम बंद करून दुसºयाच नावाने हाक मारायची. खरंच हे सर्व पटत नाही मनाला. मग वाटतं, मुलगा तयार होईल का? आपलं नाव बदलायला? मुलींनीच का नाव बदलायचं? तसं बघितलं तर मग दोघांनींही आपापली नावं बदलावीत. कारण दोघेही नवा संसार सुरू करणार असतात; पण हे जरी जमणार नसेल तर निदान मुलाने लग्नात आपल्या होणाºया बायकोचे नाव बदलू नये. इतकी वर्षे ज्या नावासोबत जोपासलेले व्यक्तिमत्त्व तिला तिच्या नावाबरोबरच राहू द्यावे, असे मला वाटते.
‘हिंदू विवाह कायद्या’तंर्गत लग्नानंतर मुलीचे नाव बदलण्याचा नियम आहे. जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येऊ नये. मात्र, अनेक कुटुंबात नवºयाच्या नावाशी मिळत-जुळत नाव असावे म्हणून नवरा लग्नानंतर आपल्या बायकोच्या मूळनावात बदल करतो असे कारण पुढे केली जातात. हे जणूकाही मुर्खपणाचे लक्षणंच म्हणावे लागेल. यात तिळमात्रही तथ्य नाही. नवरा व बायकोच्या नावात साम्यच हवे, असे कुठेही लिहिलेले नाही. खरं म्हणजे हा इतका मोठा विषयच नव्हता, बायकोच्या मूळनावत बदल करण्याची ही प्रथा कधीच थांबायला हवी होती. मला तर आता वाटत या अशा प्रथा सुरू ठेवण्यात लोकचं जबाबदार आहेत. लग्नानंतर पत्नीच्या नावात बदल करण्याबाबत पुरूष फार उत्साही असतात असे मला वाटत नाही. उलट नाव बदलणार नाही, असा आग्रह महिलांनी न धरल्याने या प्रथा आजही सुरू राहिल्या आहेत. त्यामुळे स्त्रियांनी स्वत: याकरता आवाज उठवला पाहिजे; तरच अशा प्रथा थांबवू शकू. आजच्या काळात स्त्रिया पुरूषांच्या खांद्याला खांदा देऊन काम करत आहेत. विविध क्षेत्रात नावलैकिक मिळवत आहेत. पण तरीही लग्नानंतर याच स्त्रियांना तडतोड करावी लागते, हे सत्य नाकारून चालणार नाही. याचे जिवंत उदाहरण म्हणजे, नावात करण्यात येणारा बदल. हे चित्र पुरूष बदलणार नाहीत. हे चित्र आजच्या स्त्रियांनाहीच बदलायला हवं. त्या ते बदलतील अशी आशा बाळगायला कोणाचीही हरकत नाही. याशिवाय स्त्रियांनी आवाज उठवल्यावर तिच्या जोडीदारानेही तिला साथ दिली पाहिजे. जेणेकरून तिला आनंद वाटले की, की आपल्या जोडीदाराने आपले व्यक्तिमत्त्व जपले आणि तिच्या मनात त्याच्याविषयी नक्कीच आदर वाढेल याची मला खात्री आहे.
................................
‘नामकरण’ घेणार स्त्री मनाचा ठाव
सध्या ‘स्टार प्लस’ या हिंदी वाहिनीवर लवकरच ‘नामकरण’ ही नवी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेची मुळ संकल्पनाच स्त्रीच्या स्वत: अस्तित्वावर भाष्य करणारी आहे. स्त्रियांचे अस्तित्व त्यांच्या नावापासून धरले तर एक तर ते वडिलांच्या नावाशी जोडले जाते नाहीतर विवाहानंतर पतीच्या नावाशी जोडले जाते. आताच्या काळातही आपले नाव काय लावावे, हा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य स्त्रियांना आहे का? इथूनच ही मालिका उड्डाण घेणार आहे. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्र सरकारने स्त्रियांना त्यांना हवे तसे नाव लावण्याविषयीची कायदेशीर तरतूद केलेली अहे. पण अनेक ठिकाणी अजूनही इतके स्वातंत्र्य त्यांना मिळालेले नाही. या विषयावर ‘नामकरण’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मुद्द्यांवरून अनेकांनी लेख लिहून आपली मत मांडली. पण अद्याप त्याचा परिणाम दिसून आला नाही. पण मालिका ही प्रेक्षकांच्या मनामनात रूजले. त्यामुळे मालिकेच्या माध्यामातून हा विचार समोर आल्यास समाजात नवीन क्रांती घडायला वेळ लागणार नाही.

No comments:

Post a Comment