आरती जाधव
क्षयाचा विषाणू हा अतिशय घातक आहे. ७०-८० च्या दशकात या रोगावर प्रभावी औषध नसल्याने लोक भितीच्या सावटाखाली जगत होते. हा आजार झाला की, झिजत झिजत मरण्यावाजून गत्यंतर नसे. मात्र, यावर औषध आल्यानंतर हा भयानक आजार नियंत्रणात येईल असे वाटले होते? पण रुग्णांची वाढती संख्या पाहता ही अपेक्षाही फोल ठरली. क्षयमुक्तीसाठी विविध स्तरावर जागरूकता मोहिम राबवित असल्याचे पालिका प्रशासन ठासून सांगत असते. पण प्रजा फाऊंडेशनने नुकताच प्रसिद्ध केलेल्या अहवालाद्वारे मागील पाच वर्षांत मुंबईत क्षयामुळे ३३,४४२ लोकांना जीव गमवावा लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याशिवाय, मुंबईत २०१४-१५ या वर्षात ७,०९० जणांचा क्षयामुळे मृत्यू झाल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाची आकडेवारी सांगते. तर क्षयरोग नियंत्रण विभाग या वर्षात १,३५१ मृतांची नोंद करते. यावरुन पालिका प्रशासनाचा हलगर्जीपणा स्पष्ट दिसून येत आहे. असे असताना नगरसेवकांनी पालिका प्रशासनाला एकही प्रश्न विचारला नाही. जनतेने बहुमतांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना शहरातील नागरिकांच्या आरोग्याबाबत घेणं-देणं नसेल, तर या समस्यांना कसे तोंड द्यायचे? असा प्रश्न मुंबईकरांना सतावतोय.
मुंबई शहराचा विस्तार प्रचंड मोठा आहे, हे सर्व जण ठाऊक आहे. इतक्या मोठ्या शहर राहणाºया प्रत्येक नागरिकाचे आरोग्य जपणे हे एकट्या पालिकेच्या अवाक्याबाहेर आहे. याच शंकाच नाही. पण शहरातील लोकांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी मुंबई महानगरपालिका दरवर्षी आरोग्यावर २१८ कोटी रुपये खर्च करते. याशिवाय, पालिकेचे आरोग्य विभाग जनतेला चांगल्या सुविधा बहाल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कराची वसुली करत असते. परंतु, मुंबईकरांना सोयी सुविधा मिळणे दुरच राहिले, पालिकेने आरोग्य विभागाला जनतेची सेवा करण्यासाठी नेमले असल्याचाच त्यांना विसर पडला आहे की काय अशी शंका येते. प्रजा फाऊंडेशनच्या अहवालानुसार, मुंबईत दरवर्षी सरासरी ६,६८८ जणांचा क्षयाची लागण झाल्याने मृत्यू होतो. तर जवळपास १,१८,०९३ जण डायरियाने त्रस्त आहेत. यात ६२ टक्के महिला तर ३८ टक्के पुरूषांचा समावेश आहे. याशिवाय चार वर्षाखालील २८ टक्के लहान मुलेही डायरियाचे शिकार झालेले आहेत. २०१५-१६ या वर्षात एल वॉर्डात (१२,३११), एम/ई वॉर्डात (११,८०५) आणि एन वॉर्डात (१०,२३९) सर्वांधिक रुग्णांची नोंद झाली आहे.
डेंग्यूचा आकडा २०११ ते २०१५ पर्यंत ८० टक्क््यांनी वाढला आहे. तर डेंग्यूमुळे होणाºया मृतांमध्ये दुप्पटीने वाढ झाली आहे. २०१४-१६ पर्यंत कॉलराच्या नोंदीमध्ये सात पटीने वाढ झाली आहे. कारण २०१४-१५ या वर्षात रुग्णांची संख्या ३१ वर होती. पण २०१५-१६ या वर्षात ही संख्या २०७ वर पोहोचली आहे. महत्त्वाचं म्हणजे, या आजारांपेक्षा क्षयरोगाने मुंबईकरांना हैराण केले आहे. जसे, अहवालानुसार मुंबईत गेल्या पाच वर्षात ३३,४४२ जणांचा क्षयरोगामुळे मृत्यू झाला आहे. याचा अर्थ मुंबईत दररोज १९ रुग्णांचा क्षयामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पण पालिका प्रशासन मृताचा कमी आकडा दाखवून वेळ मारून नेत असल्याचेही या अहवालाद्वारे उघड झाले आहे. एप्रिल २०१५ ते डिसेंबर २०१५ या आठ महिन्यात क्षयरोगामुळे ४,०७७ जणांचा मृत्यू झाला होता. या मृतांमध्ये २० ते ६० वयोगटातील ३,८०६ तर १९ वयोगटाखालील २७१ जणांचा सहभाग होता, असेही अहवालात नमूद केले आहे.
क्षयरोग हा संसर्गजन्य आजार आहे हे आता सर्वज्ञात आहे. वेळेवर निदान व उपचार झाल्यास हा आजार पूर्णपणे बरा होतो हे सुद्धा सर्वांना माहित आहे. पण अजूनही क्षयरोगाबाबत सर्वसामान्यांच्या मनात एक अनामिक भीती आहे. समाजातून क्षय नष्ट व्हायचा असेल तर प्रत्येक रुग्ण बरा व्हायला हवा. मात्र, दुदैवाने ते होताना दिसत नाही. या आजाराच्या लक्षणांकडे गांभीर्याने पाहिजे जात नाही. विशेष म्हणजे, हा आजार बरा होण्यासाठी एकाच वेळी तीन व चार प्रकारची औषधे वापरली जातात. कारण, क्षयाचा विषाणू अतिशय शक्तीशाली असतो. पण या औषधांना सुद्धा हा विषाणू दाद देत नाही. यामुळे क्षयरोगाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी आरोग्य विभागाने क्षयरुग्णांना दररोज औषध देण्याचा निर्णय घेतला. उपचार सुरू झाल्यावर काही दिवसात रुग्णाला बरे वाटू लागते. पण रुग्ण औषध देण टाळतो, ‘डॉट्स’ केंद्रावर जाण्यास टाळाटाळ करतो. वेळेवर औषध न घेतल्यास क्षयाचे विषाणू शरीरात तग धरून बसतात. काही काळांनी ते उपचारांना दाद देईनासे होतात. या रुग्णांमध्ये पुन्हा लक्षणे दिसू लागतात. मग, पहिल्यांदा रुग्णाला दिली जाणारी औषध या विषाणूंवर मात करू शकत नाही. याबाबत रुग्णांना पुरेशी माहिती नसते. परिणामी रुग्णाच्या शरीरातील क्षयाची विषाणू ‘एमडीआर’ आणि ‘एक्सडीआर’ क्षयाचे भयानक रुप धारण करतो. हे टाळण्यासाठी क्षयरोग औषधाचे किट कुटुंबातील सदस्यांकडे सोपविले जाणार असून रुग्णाने औषध घेतले की नाही याची नोंद या सदस्याला ठेवावी लागणार आहे. सप्टेंबर २०१६ पासून या नव्या उपक्रमाला सुरूवात होईल. क्षय मुक्तीसाठी राबवण्यात येणारा हा उपक्रम सुरू झाल्यानंतर क्षयाच्या रुग्णसंख्येत घट होते की नाही? हे पाहायला मिळेल. पण त्यासाठी या नव्या उपक्रमाला प्रत्येकाने स्विकारून क्षयाचे शुन्य उद्दिष्ट गाठण्यासाठी पालिका प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे.
..............................
क्षयाची लक्षणे
बारीक कणकण, भूक मंदावणे, अशक्यपणा, संध्याकाळी ताप व खोकला येणे, खोकल्यातून रक्त पडणे, वजन कमी होणे व दम लागणे.
क्षयाचा विषाणू हा अतिशय घातक आहे. ७०-८० च्या दशकात या रोगावर प्रभावी औषध नसल्याने लोक भितीच्या सावटाखाली जगत होते. हा आजार झाला की, झिजत झिजत मरण्यावाजून गत्यंतर नसे. मात्र, यावर औषध आल्यानंतर हा भयानक आजार नियंत्रणात येईल असे वाटले होते? पण रुग्णांची वाढती संख्या पाहता ही अपेक्षाही फोल ठरली. क्षयमुक्तीसाठी विविध स्तरावर जागरूकता मोहिम राबवित असल्याचे पालिका प्रशासन ठासून सांगत असते. पण प्रजा फाऊंडेशनने नुकताच प्रसिद्ध केलेल्या अहवालाद्वारे मागील पाच वर्षांत मुंबईत क्षयामुळे ३३,४४२ लोकांना जीव गमवावा लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याशिवाय, मुंबईत २०१४-१५ या वर्षात ७,०९० जणांचा क्षयामुळे मृत्यू झाल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाची आकडेवारी सांगते. तर क्षयरोग नियंत्रण विभाग या वर्षात १,३५१ मृतांची नोंद करते. यावरुन पालिका प्रशासनाचा हलगर्जीपणा स्पष्ट दिसून येत आहे. असे असताना नगरसेवकांनी पालिका प्रशासनाला एकही प्रश्न विचारला नाही. जनतेने बहुमतांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना शहरातील नागरिकांच्या आरोग्याबाबत घेणं-देणं नसेल, तर या समस्यांना कसे तोंड द्यायचे? असा प्रश्न मुंबईकरांना सतावतोय.
मुंबई शहराचा विस्तार प्रचंड मोठा आहे, हे सर्व जण ठाऊक आहे. इतक्या मोठ्या शहर राहणाºया प्रत्येक नागरिकाचे आरोग्य जपणे हे एकट्या पालिकेच्या अवाक्याबाहेर आहे. याच शंकाच नाही. पण शहरातील लोकांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी मुंबई महानगरपालिका दरवर्षी आरोग्यावर २१८ कोटी रुपये खर्च करते. याशिवाय, पालिकेचे आरोग्य विभाग जनतेला चांगल्या सुविधा बहाल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कराची वसुली करत असते. परंतु, मुंबईकरांना सोयी सुविधा मिळणे दुरच राहिले, पालिकेने आरोग्य विभागाला जनतेची सेवा करण्यासाठी नेमले असल्याचाच त्यांना विसर पडला आहे की काय अशी शंका येते. प्रजा फाऊंडेशनच्या अहवालानुसार, मुंबईत दरवर्षी सरासरी ६,६८८ जणांचा क्षयाची लागण झाल्याने मृत्यू होतो. तर जवळपास १,१८,०९३ जण डायरियाने त्रस्त आहेत. यात ६२ टक्के महिला तर ३८ टक्के पुरूषांचा समावेश आहे. याशिवाय चार वर्षाखालील २८ टक्के लहान मुलेही डायरियाचे शिकार झालेले आहेत. २०१५-१६ या वर्षात एल वॉर्डात (१२,३११), एम/ई वॉर्डात (११,८०५) आणि एन वॉर्डात (१०,२३९) सर्वांधिक रुग्णांची नोंद झाली आहे.
डेंग्यूचा आकडा २०११ ते २०१५ पर्यंत ८० टक्क््यांनी वाढला आहे. तर डेंग्यूमुळे होणाºया मृतांमध्ये दुप्पटीने वाढ झाली आहे. २०१४-१६ पर्यंत कॉलराच्या नोंदीमध्ये सात पटीने वाढ झाली आहे. कारण २०१४-१५ या वर्षात रुग्णांची संख्या ३१ वर होती. पण २०१५-१६ या वर्षात ही संख्या २०७ वर पोहोचली आहे. महत्त्वाचं म्हणजे, या आजारांपेक्षा क्षयरोगाने मुंबईकरांना हैराण केले आहे. जसे, अहवालानुसार मुंबईत गेल्या पाच वर्षात ३३,४४२ जणांचा क्षयरोगामुळे मृत्यू झाला आहे. याचा अर्थ मुंबईत दररोज १९ रुग्णांचा क्षयामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पण पालिका प्रशासन मृताचा कमी आकडा दाखवून वेळ मारून नेत असल्याचेही या अहवालाद्वारे उघड झाले आहे. एप्रिल २०१५ ते डिसेंबर २०१५ या आठ महिन्यात क्षयरोगामुळे ४,०७७ जणांचा मृत्यू झाला होता. या मृतांमध्ये २० ते ६० वयोगटातील ३,८०६ तर १९ वयोगटाखालील २७१ जणांचा सहभाग होता, असेही अहवालात नमूद केले आहे.
क्षयरोग हा संसर्गजन्य आजार आहे हे आता सर्वज्ञात आहे. वेळेवर निदान व उपचार झाल्यास हा आजार पूर्णपणे बरा होतो हे सुद्धा सर्वांना माहित आहे. पण अजूनही क्षयरोगाबाबत सर्वसामान्यांच्या मनात एक अनामिक भीती आहे. समाजातून क्षय नष्ट व्हायचा असेल तर प्रत्येक रुग्ण बरा व्हायला हवा. मात्र, दुदैवाने ते होताना दिसत नाही. या आजाराच्या लक्षणांकडे गांभीर्याने पाहिजे जात नाही. विशेष म्हणजे, हा आजार बरा होण्यासाठी एकाच वेळी तीन व चार प्रकारची औषधे वापरली जातात. कारण, क्षयाचा विषाणू अतिशय शक्तीशाली असतो. पण या औषधांना सुद्धा हा विषाणू दाद देत नाही. यामुळे क्षयरोगाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी आरोग्य विभागाने क्षयरुग्णांना दररोज औषध देण्याचा निर्णय घेतला. उपचार सुरू झाल्यावर काही दिवसात रुग्णाला बरे वाटू लागते. पण रुग्ण औषध देण टाळतो, ‘डॉट्स’ केंद्रावर जाण्यास टाळाटाळ करतो. वेळेवर औषध न घेतल्यास क्षयाचे विषाणू शरीरात तग धरून बसतात. काही काळांनी ते उपचारांना दाद देईनासे होतात. या रुग्णांमध्ये पुन्हा लक्षणे दिसू लागतात. मग, पहिल्यांदा रुग्णाला दिली जाणारी औषध या विषाणूंवर मात करू शकत नाही. याबाबत रुग्णांना पुरेशी माहिती नसते. परिणामी रुग्णाच्या शरीरातील क्षयाची विषाणू ‘एमडीआर’ आणि ‘एक्सडीआर’ क्षयाचे भयानक रुप धारण करतो. हे टाळण्यासाठी क्षयरोग औषधाचे किट कुटुंबातील सदस्यांकडे सोपविले जाणार असून रुग्णाने औषध घेतले की नाही याची नोंद या सदस्याला ठेवावी लागणार आहे. सप्टेंबर २०१६ पासून या नव्या उपक्रमाला सुरूवात होईल. क्षय मुक्तीसाठी राबवण्यात येणारा हा उपक्रम सुरू झाल्यानंतर क्षयाच्या रुग्णसंख्येत घट होते की नाही? हे पाहायला मिळेल. पण त्यासाठी या नव्या उपक्रमाला प्रत्येकाने स्विकारून क्षयाचे शुन्य उद्दिष्ट गाठण्यासाठी पालिका प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे.
..............................
क्षयाची लक्षणे
बारीक कणकण, भूक मंदावणे, अशक्यपणा, संध्याकाळी ताप व खोकला येणे, खोकल्यातून रक्त पडणे, वजन कमी होणे व दम लागणे.
No comments:
Post a Comment